आठवण


आठवण

आयुष्याच्या या रम्य पहाटे 
आठवणींचा सूर्य उगवे हा 
बेधुंध होई मन माझे 
तुझ्याशिवाय करमे ना… 

कुणासाठी मी झुरणे,
हे मला पटले नसते
तुझ्या आठवणीच्या शिवाय जगणे
हेच मला खटकले असते

राविकीरनाच्या आगमनाने
दवबिंदूही विरून जातो
थोड्याश्या या सुखागमनाने
जुना दुख ओघ सरुन जातो

तुझ्या आठवणीत रमणे
हेच आता माझे जिणे
जणू पावसाच्या आगमनाची
चातकाची वाट पाहणे

आज अस कस काय घडल
जुन्या आठवणीनित मन रडल
सुखाच्या या राखीव क्षणी
परतीसाठी हे मन सरसावले
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)