Posts

Showing posts from December, 2014

हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- कलिंग (ओरिसा ) चा "सम्राट खारवेल"

Image
हिंदुस्थानच्या इतिहासातील राजे :- कलिंग (ओरिसा ) चा "सम्राट खारवेल" सम्राट अशोकाच्या मृत्युनंतर दहा एक वर्षात अशोक वंशीयांचे आधिपत्य नाकारुन स्वताचे राज्य स्थापणा-या दाक्षिणात्य राज्यातील आंध्र व ओरिसा(कलिंग) राज्यांपैकि कलिंग चा राजा म्हणजे सम्राट खारवेल. डेमेट्रियस (ग्रिक)सैन्याचा संपूर्ण हिंदुस्थानात कोणीहि प्रतिकार करत नसताना राजा खारवेलने शस्त्रसज्ज सैन्यासह अयोध्ये च्या आसपास च्या परिसरात आक्रमण करुन हिंदुस्थानच्या पर्वत सिमेपार पाठविले. कलिंगात या विजयाप्रित्यर्थ राजसुय यज्ञाचे आयोजन करण्यात आले ४०-५०वर्षातला तो सर्वात मोठा यज्ञ समजला जातो. संपूर्ण हिंदुस्थानात निशस्त्रीकरणाचे वारे वाहत असताना क्षात्रतेज जागविणारा राजा म्हणुन खारवेल चा उल्लेख करायला हवा. खारवेल चे डेमेट्रियस ग्रिकांवरील आक्रमण ही क्रांति होती ज्याच्या बळावर पुढे मिन्यांडर ग्रिकांवर आक्रमण करुन त्यांना हिंदुस्थानबाहेर हाकलुन लावण्यासाठि व हिंदुस्थानातुन ग्रिकांचे नामोनिशान मिटवुन टाकण्यास उपयुक्त ठरली. माहिती स्त्रोत :- सहा सोनेरी पाने - स्वातंत्रवीर सावरकर छायचित्र स्त्रोत :- Internet दुर

खरी लढाई

Image
दुस-याला "बाजूला करण्यासाठी" "लढण्यापेक्षा", "दुस-याच्या बाजूने" "लढून" पहा…. दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

हिंदुस्थानातच्या इतिहासातील राजे :- सम्राट बिंदुसार

Image
हिंदुस्थानातच्या इतिहासातील राजे :- सम्राट बिंदुसार "सम्राट चंद्रगुप्त" व "ग्रीक राजा सेल्युकस" ची राजकन्या यांचा विवाह झाला व त्यांचाच पुत्र "बिंदुसार". ई.स.पू. २९८ ला "चंद्रगुप्त" मरण पावला व "बिंदुसार" त्या गादीवर बसला. "बिंदूसार" हा पित्याप्रमाणे महाराक्रमी होता. त्याने "चंद्र्गुप्ताचे" अखंड हिंदुस्थान चे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने घोडदौड सुरु केली होती. उत्तर हिंदुस्थानात आपले एकछत्री अंमल प्रस्थापित केल्यावर त्याने दक्षिण स्वारी केली आणि तिथेही आपले राज्य प्रस्थापित केले. त्याच्या पराक्रमाने त्याचे शत्रू त्याच्या विरोधात उभे राहत नव्हते. त्याच्या याच पराक्रमाने त्याला "अमित्रघात" म्हणजेच "शत्रूंचा कर्दनकाळ" हि पदवी मिळाली होती. त्याने उत्तर - दक्षिण - पूर्व - पश्चिम अश्या संपूर्ण हिंदुस्थानात आपले एकछत्री अंमल प्रस्थापित केले होते. पूर्व नि पश्चिम समुद्राच्या मध्यांतरीच्या तब्बल १७ राजधान्या "मौर्य साम्राज्यात" सामील करून घेतल्या असा उल्लेख ग्रंथातून आढळतो. "सम्राट

संवत् / संवस्तर / शक म्हणजे काय?

Image
संवत् / संवस्तर / शक म्हणजे काय? आपण आपले मराठी कॅलेंडर निट पाहिले तर "शालीवाहन शके 1936" किंवा "विक्रम संवत् 2071" वगैरे दिसेल हे नक्की काय असते आणि याची उत्पत्ती कुठून झाली हे आपणांस कदाचीत माहीत नसेल. यावर्षीच - 2014च कॅलेंडर निट पाहिले तर लक्षात येते की, "गुढिपाडवा" "31 मार्च 2014" रोजी "शालीवाहन शके 1936 प्रारंभ" असे आहे. "दिपावाली पाडवा" "24 ऑक्टोबर 2014" रोजी "विक्रम संवत् 2071 प्रारंभ" असे आहे. म्हणजे "शालिवाहन शक" "येशु ख्रिस्त" च्या नंतर सुरू झाले व "विक्रम संवत्" हे "येशु ख्रिस्ताच्या" अगोदर सुरू झाले. संवत् / सवस्तर / शक म्हणजे एखाद्या राजाने त्याने केलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून त्या दिवासापासुन नविन वर्ष सुरू करणे. प्रथम "शक" हा शब्द "संवत् / संवस्तर" यासाठी पर्यायी "परकिय शब्द" आहे. इतिहासात उपलब्ध नोंदिनुसार आजवर टिकलेले काहि संवत् उपलब्ध आहेत :- 1. कृत किंवा मालव 2. विक्रम 3. शालिवाहन > ई.स. पूर्व 5

एक अतूट नाते :- शिवप्रेमींचे

Image
तुम्ही एखादे चांगले कार्य करता तेव्हा तुमच्या सोबत येणारी माणसे हि चांगलीच असतात, त्यांचा तुमच्यासोबत येण्याचा उद्देशहि स्वच्छ असतो. याचाच प्रत्यय आज "दुर्गवीर" च्या शस्त्र प्रदर्शन व गडसंवर्धन छायचित्र प्रदर्शनात आला. "दुर्गवीर" च्या कार्याने प्रभावित होऊन पंजाब बॉर्डर वरून शिर्डी आणि शिर्डी वरून मुंबई असा प्रवास करून आलेल्या "सोमनाथ ढवळे" यांची भेट घेताना जाणीव झाली आम्ही काय कमावलाय. फेसबुक वरून माझे दुर्गवीर श्रमदानाचे फोटो पाहून दुर्गवीर बद्दल त्यांना आदर निर्माण झाला आणि त्यांच्या १० दिवसाच्या सुट्टीचा पहिला दिवस दुर्गवीरांसोबत घालविण्यासाठी "सोमनाथ ढवळे" मुंबईत हजर झाले. मुंबईतील काहीही माहिती नाही. दादर ला उतरल्यावर त्यांनी चौकशी केली तर त्यांना कोणी सांगितले काळाचौकी ३ ठिकाणी आहे परंतु शिवकृपेने एका व्यक्तीने त्यांना Taxi करून प्रदर्शनाच्या जागी आणून सोडले. ह्या घटनेतून एक मात्र नक्की माझी आणि त्यांची ओळख,व "त्या "अनोळखी व्यक्तीने" त्यांना मुंबईत मदत करण, आणि दुर्गवीरांची भेट हे सर्व विधिलिखित होत. या सर्व भेटी शिव

"शिवराय" म्हणजेच "गडकिल्ले" आणि "गडकिल्ले" म्हणजेच "स्वराज्य" !!!

Image
काय। करतोय "हा" "दादा" !! असाच प्रश्न या मुलाला पडला !! वेळ होती दुर्गवीर च्या गडसंवर्धन छायचित्र प्रदर्शनाची..... या मुलाला "गडसंवर्धन" हा शब्द सुद्धा निट बोलता येत नव्हता त्याला जेव्हा विचारलं हे शिवाजी महाराज कोण होते? आणि हे गड-किल्ले म्हणजे काय रे!! तेव्हा त्याचे उत्तर मोठमोठ्यांना अव्वाक करुन जाते!! "शिवाजी महाराज हे मोठे राजे होते आणि त्यांनी तलवारीने मोठमोठ्या लढाया केल्या!! आणि या किल्ल्यांवर ते राहिले"..... शिवरायांनी स्वतासाठि राजवाडे नाहि बांधले तर आयुष्यभर या गड-किल्ल्यांच्या साथीने    ते    लढले... जे या निरागस मुलाला समजलं ते आपल्यालाहि समजायला हवं... शिवराय म्हणजेच गडकिल्ले आणि गडकिल्ले म्हणजेच आपले स्वराज्य !!! जय शिवराय छायचित्र सौजन्य "दुर्गवीर सचिन रेडेकर" www.durgveer.com दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/

"अलेक्झांडर" आणि "चंद्रगुप्त"

Image
"अलेक्झांडर" आणि "चंद्रगुप्त" "अलेक्झांडर" हा ग्रिकांचा महान राजा ज्याला त्याच्या पित्याकडुन (राजा फिलिप) 'प्रचंड पैसा व सैन्य बळ' मिळाले त्याच्या बळावर तो ग्रिक मधील सर्व छोट्या मोठ्या गणराज्यांना गिळंकृत करत आला. परंतु "हिन्दुस्तानी" जनतेने त्याच "स्वामित्व" कधीच मानले नाहि उलट तो जो प्रदेश जिंकुन पुढे जायचा तिथली जनता त्याची पाठ फिरताच दंड ठोकुन उभे राहायचे जेव्हा त्याला जाणवलं आपला येथे निभाव लागण अशक्य आहे तेव्हा त्याने परतायचा निर्णय घेतला परंतु जाता जाता त्याची महत्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसु देत नव्हती व तो सैन्याच्या मनाविरुध्द लढाया लढत होता...परंतु पाश्चात्य लेखक अलेक्झांडर च वर्णन करताना त्याला "जिंकायला प्रदेश न उरल्याने हताश होऊन परत गेला" असं करतात हे खुपच अतिशयोक्तिपूर्ण आहे. दुस-या बाजुला "चंद्रगुप्त राजा" जो अलेक्झांडर च्या स्वारि अगोदरपासुन "अखंड हिंदुस्थान" चे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठि धडपडत होता त्याचा इतिहास जाणुनबुजून दडपला जातो. जेव्हा "चंद्रगुप्त" "अखंड ह

"जगण्यासाठी झटण्यापेक्षा… झटण्यासाठी जगून पहा"

Image
कित्येक लोक आम्हा "दुर्गवीरांना" विचारतात हे एवढ हात-पाय तोडून, एवढी किल्ल्यांवर कामं करता… काय मिळत तुम्हाला हे सर्व करून….… या प्रश्नाच उत्तर एकच आहे, "आम्हाला तेच मिळत जे बाजीप्रभूंना घोडखिंडीत प्राण देऊन मिळाले" "आम्हाला तेच मिळत जे कोंढाणा जिंकताना हौतात्म्य पत्करणा-या तानाजी मालुसरेंना मिळाले" "आम्हाला तेच मिळत महाराजांच्या एक शब्दावर शरीराची चाळण होइपर्यत लढणा-या प्रतापराव(कुड्तोजी) गुजर यांना मिळाल… आज आम्हाला शंभरी पार करणारे आमचे पूर्वज कदाचित आठवणार नाहीत पण ऐन पन्नाशीत देवाज्ञा घेणारे शिवराय आणि ऐन तिशीत बलिदान देणारे शंभूराजे आपण विसरणे अशक्य आहे. म्हणून जन्माला येउन किड्या मुंग्याच आयुष्य जगणं आम्हाला मान्य नाही म्हणूनच आम्ही दुर्गवीर या कार्यसाठी झटतोय…… तुम्हीसुद्धा "जगण्यासाठी झटण्यापेक्षा… झटण्यासाठी जगून पहा" जय शिवराय www.durgveer.com दुर्गवीर  चा  धीरु माझे अंतरंग http://dhiruloke.blogspot.in/