"दर्शन धाकल्या धन्याच- मोहीम वढू-तुळापुर"




प्रथम तुम्ही माझ्या पहिल्या लेखाला (काही क्षण हसरे :- मोहीम वढू-तुळापुर) उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. आता दुसरा भाग "दर्शन धाकल्या धन्याच- मोहीम वढू-तुळापुर"

शिवजयंतीचा उत्सव उत्साहात पार पडला. आता तयारी सुरु झाली मोहीम वढू-तुळापुरची. तस माझ मोहीम वढू-तुळापुर ला जाणं जवळपास रद्द झालेलं कारण रविवारी Audit होत. पण माझ मन मला स्वस्थ बसू देत नव्हत. मला स्वताचाच राग येत होता. किती दिवसांपासून माझी इच्छा होती या २ पवित्र स्थानांना भेट देण्याची. मन सारख खात होत मला. खर तर शिवजयंतीच्या कार्यक्रमात माझ लक्षच लागत नव्हत. मी अक्षरशा रडकुंडीला आलो होतो. अधून मधून राज दादा मला सांगत होता "धीरु तू येतोयस", "मला बाकी काही सांगू नकोस तू येतोयस"… खूप विचार केला शेवटी ठरवलं जायचं मोहीम वढू-तुळापुर ला जायचं बाकी सर्व गेल उडत…आम्ही कसे निघालो तिथे काय अनुभवल हे मी या अगोदरच्या " (काही क्षण हसरे :- मोहीम वढू-तुळापुर)" या लेखात मांडलाय मी मुद्दामहून २ लेख लिहिले कारण आम्ही वढू-तुळापुर या दोन ठिकाणी जे अनुभवल ते अप्रतिमच होत. 
आम्ही अजय दादांच्या घरून थेट तुळापुर ला पोचलो आम्हाला कल्पना होती तिथे आम्ही अंगावर शहारे येणारे अनुभव घेणार आहोत. आम्ही गाडीतून उतरलो समोर बघितले भव्य प्रवेशद्वार आतमध्ये काही पर्यटक डब्बा खातायत, काही दुकान मांडली आहेत, कोण झोपलय काय आणि कोण अजून काय करताय? शे… या डोळ्यांना अक्षरश यातना होत होत्या अरे आमच्या धाकल्या धन्यान स्वराज्यासाठी स्वताच्या आयुष्याचे बलिदान दिले तिथे तुम्ही पिकनिक कसली काढताय! तिथल्या प्रत्येकाला पकडून सांगावे असे वाटत होते " अरे मुर्खानो हि पिकनिक ची जागा नाही रे!" इथे शंभू राजेंनी प्राण सोडले, त्याची हि अशी विटम्बना. खरच औरंगजेब जेव्हा डोळ्यात तप्त सळ्या घुसवत होता त्यावेळी शंभू राजेना जितक्या यातना झाल्या नसतील त्यापेक्षा कितीतरी जास्त यातना आज होत असतील, आज त्या समाधीस्थळाची होत असलेली दुरवस्था पाहून…. अरे तुम्हाला काहीच कसे वाटत नाही रे! ज्या जागेची धूळ मस्तकी घेऊन यावी तिथे तुम्ही बसून डबे काय खाताय, झोपताय काय? चीड आली ते सर्व पाहून. शेकडो वर्षापुर्वी परकीयांनी आपल्या राजांचा अपमान केला पण आज त्या राजेंचा अपमान करणारे कोणी परके नाही आपलेच आहेत. अहो ज्या भामा, भीमा, इंद्रायणी तीरी ते संगमेश्वराचे मंदिर, समोर शंभू राजेंची भव्य मूर्ती पुढे कावि कलश व शंभू राजेंची समाधी इतक्या पवित्र स्थानी काय रे हे अपवित्र वर्तन. अरे काही मोजक्या पैश्यांसाठी आणि क्षणीक आनंदासाठी बाजार मांडलाय या पवित्र स्थानाचा. 
इथे आलो तेव्हा मनात वेगळेच विचार होते पण इथे जे बघितले ते पाहून मन अस्वस्थ झाल. राजे तुम्ही धर्मासाठी, स्वराज्यासाठी आपले प्राण दिलेत पण हे "स्वार्थी लोक" सर्व आत्मीयता विसरून भलतीकडे चाललेत हो…. राजे थांबवा हे सर्व… आम्ही तिथून पुढे गेलो जिथे तीन नद्यांच संगम होतो. भामा, भीमा, इंद्रायणी पण तिथेही तेच, कोण कपडे धुतय, कोण गर्मी होतंय म्हणून आंघोळ करतय आणि काय काय? अक्षरश: रडायला येत होत ती विटम्बना पाहून. अस वाटत होत आपण उगाचच इतर धर्मियांना दोष देतो अहो इथे आपलच "नाण खोट" आहे त्याला काय करणार. तिथे त्या त्रिवेणी संगमाच्या नदीचा इतिहास तुळापुरचा इतिहास लिहिलेला फलक होता तो आम्ही वाचत होतो तेवढ्यात तिथे एक वृद्ध स्त्री आली तिने त्या फलकाच्या समोर हात आणि तोंड धुतले काय म्हणावं याला…अरे हात धुण, आंघोळ करण, कपडे धूण हे सर्व करायची हि ती जागा आहे का? 
हा राजेंच्या पावित्र स्थळाचा होत असलेला अपमान आम्ही सहन करतच तिथून निघालो वढू च्या दिशेने मनात सल कायम होती का होतेय अशी विटम्बना…. आमच्या धाकल्या धन्याची…. अश्या पवित्र स्थळांना पिकनिक स्पॉट म्हणून भेट देन आणि त्या स्थळाचा अपमान / विटम्बना करण कधी थांबणार???? हा एकच सवाल माझ्या मनात होता(कदाचित सर्व दुर्गवीरांच्या मनातहि हाच प्रश्न असावा). 
तिथून निघाल्यावर आम्ही पोचलो वढू ला मनात भीती होती इतेही तोच बाजार मांडला नसेल ना!! पण खरच इथे त्याच्या अगदी विरुद्ध वातावरण होत. अगदी शांतता. समोर शंभू राजेंची समाधी. आम्ही समाधीच दर्शन घेतलं. तिथे माथा टेकताना अंगात अक्षरशा विज चमकून गेली. एक क्षण खरच शंभू राजेंच्या चरणावर माथा टेकतोय अस वाटत. कंठ दाटून आला. पण तसाच आवंढा गिळत मी दर्शन घेतले. बाजूलाच जाउन बसलो सगळे दुर्गवीरांनी शंभूमहाराज, शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. समाधीभोवती आम्ही सर्व दुर्गवीर बसलो. कोणीतरी शंभू राजेंचे "बाळ इथे निजला" हे काव्य लावण्याची विनंती केली. काव्य सुरु झाल "भीमा इंद्रायणी तीरी…." समोर तो भामा भीमा इंद्रायणीचा संगम तरळू लागला. "वढू तुळा संगमावरी… " दोन पवित्र स्थान खाडकन डोळ्यासमोर उभी राहिली. "मृत्युंजय संभाजी पाहून मृत्यूहि थिजला…" समोर एक बाणेदार, तेजस्वी, रौद्र रूप समशेरीसह उभे राहून मृत्यूला आव्हान देताना दिसले…. ते रूप डोळ्यातून अक्षरशा आग ओकत होते. वाटत होते बस…. राजे बस…. हेच रूप घेऊन या आणि संपवून टाका गनिमांना…. आणि पुढच्याच क्षणी पुढची ओळ कानावर पडली आणि डोळ्यात टपकन पाणी आल ते वाक्य होत "बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे निजला"…. ते संपूर्ण काव्य आम्हा सर्वा दुर्गवीरांना त्या राजेंच्या बलिदानाच्या प्रसंगात घेऊन गेले. वाघा सारखे आलेले आलेले शंभू राजे शिवबांसारखे जगून, सिंहासारखे मरण झेलून एक तेजस्वी राजा म्हणून अमर झालेले शंभू राजे माझ्या डोळ्यासमोर तरळू लागले(कदाचीत सर्वांच्या). कधी कुणाला शरण न जाता प्रसंगी मरण पत्करणारे शंभू राजे शिकण्यासारखे आहेत आजच्या स्वार्थी आणि लाचार लोकांनी.…. खरच निस्वार्थी जगण आणि धर्मासाठी, देशासाठी बलिदान देण म्हणजे काय हे शंभूराजेना जाणल्यावर समजत, पण त्यासाठी शंभू राजेंच तो निस्वार्थीपणा शिकला तर पाहिजे… 
मुजरा राजे मुजरा तुमच्या चिकाटीला, जीद्धीला तुम्ही अवघ जीवन रणांगणात घालवल पण हार म्हणून कधी मानली नाही. आयुष्यात आलेल्या प्रचंड दुखांवर मात करून शिवरायांचे स्वप्न साकार करण्यासाठी जो सागरारूपी पराक्रम केला तो तुमच्या बलिदानाने, करुणेचा / दुखाचा आगर झालाय…. दगडा सारखा अखंड/अभेद्य असा सह्याद्री तुमच्या बलिदानाने अश्रुनी भिजलाय राजे…… असा भावार्थ त्या काव्याच्या प्रत्येक ओळीतून व्यक्त होत होता. या काव्याच्या प्रत्येक ओळीनुसार आम्हा सर्वांचा मन हेलावून जात होत. खर सांगतो किती स्वताला थांबवल तरी प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.(प्रत्येकजण ते दाखवत नव्हता एवढच). नील दादांकडे माझ सहज लक्ष गेल, तर एरवी हसतमुख राहणारा नील दादाच्या डोळ्यातून पाणी वाहत होत इतर सर्वांची अवस्था काही वेगळी नव्हती. काही क्षण तिथे स्तब्धता होती कोणी काहीही बोलत नव्हते… कारण प्रत्येकजण शंभू राजेना डोळ्यासमोर पाहत होता. थोडा वेळ तसाच गेला. कुणाच्या तोंडातून एक चकार शब्द येत नव्हता कसा येणार सर्वांचे गळे दाटून आले होते. मी तिथून उठलो आजूबाजूचा परिसर न्याहाळला खरच तिथे कुठेतरी शंभूराजेंचे वास्तव्य असल्याचा भास झाला. तिथे थोडा वेळ गेल्यावर बाहेर आलो तिथेहि थोडा वेळ आम्ही बसलो. सारख वाटत होत या जागेत काहीतरी आहे. नक्कीच शंभूराजेंच वास्तव्य तिथे असावे. आजूबाजूच्या झाडाच्या पानांचे आवाज तिथलि शांतता भंग करत होते. एखाद्या पक्ष्याचा आवाज मनात धडकी भरवत होता. इतकी शांतता!!! 
मनात विचारचक्र चालू होते का अस? वढू आणि तुळापुर दोन्हीही पवित्र स्थान मग एका जागेवर तिथले पावित्र्य "नष्ट करून टाकलेले" आणि दुस-या ठिकाणी "अजूनतरी" "पावित्र्य राखलेले"…. खरच कलियुग म्हणतात ते हेच कदाचित आपण सर्व गोष्टीची फक्त वाट लावतोय. सर्व पवित्र गोष्टींचा बाजार करतोय. कुठल्या धार्मिक स्थळावर जा तिथे बाजार! कुठल्या ऐतिहासिक स्थळावर जा तिथे बाजार! कुठेही जा फक्त आणि फक्त बाजार! मन हेलावत हो, हा बाजार पाहून…. किती सोसायच त्यांनी… शंभू राजेंच्या समाधीच्या त्या वढू आणि तुळापुर यापैकी सरस स्थळ कोणतं हे सांगायचा माझा अजिबात प्रयत्न नाही. दोन्ही स्थळ आमच्यासाठी सारखीच पण त्याच पावित्र्य नष्ट केलय ते आपल्यातील काही लोकांनी, तेही स्वताच्या स्वार्थासाठी...
कधी थांबणार हि विटम्बना!!!! आहे का कोणाकडे याचे उत्तर 
जय शिवराय 
जय शंभू राजे 
दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….