मातृ-पितृ देवो भव....
सारांश काय तर आईवडीलांना वा-यावर सोडणा-या मुलांना फारस यश मिळत नाहि. हा चित्रपट होता म्हणून कथेनुसार त्या आईवडीलाना श्रीमंत मुलाने दत्तक घेतले पण वास्तवात अस कोणी दत्तक नाही घेणार तुमच्या आईवडीलाना. प्रत्येक मुलाने आपल्या आईवडीलांना त्रास देताना थोडा विचार करा त्यांनी तुमच्यासाठी किती त्रास सहन केलाय. वृद्धाश्रम हे कितीही मोठ, पंचतारांकित असल तरी ते तुमच्या आईवडीलांसाठी रस्त्यासारखेच भासते. तुमच एखाद छोटस झोपड जरी असल तरी ते त्यांच्यासाठी महालाप्रमाणे असते. त्यांना पैसा, वैभव याची गरज नसते गरज असते ती तुमच्या प्रेमाची. तुम्ही किती पैसा कमविता याला महत्व नसते तर तुम्ही किती आशीर्वाद कमवता याला महत्व असते. आईवडीलांसाठी जगातील कोणतीही गोष्ट सोडावी लागली तरी चालेल पण आई वडिलांना कधी गमावू नका. आई वडिलांची किंमत काय असते हे ज्यांना आईवडील नाहीत त्यांना विचारा. ज्यांच्या जगण्याचा अर्थ फक्त तुम्ही होता त्यांच्या जगण्याची झालेली वाताहत तुम्ही कशी पाहू शकता. आज दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे हे कशाचे लक्षण आहे. आपण आपले आईवडील USE & THROW समजतो का आयुष्यभर त्यांनी आपल्यासाठी खस्ता खायच्या आणि ज्यावेळी त्यांनी आराम करायला हवा तेव्हा आपण वा-यावर कस काय सोडू शकतो. .....
माझ्यासाठी तर माझे आई वडील दैवत आहेत आणि मला आशा आहे तुमचहि मत हेच असेल
मातृ-पितृ देवो भव....
जय शिवराय
दुर्गवीर चा धीरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/
Comments
Post a Comment