सरकारला गणेशोत्सवाची गरज नाही - आयुक्त बिपीन मलीक
सरकारला गणेशोत्सवाची गरज नाही - आयुक्त बिपीन मलीक
महाराष्ट्र सदनात या वर्षी गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही असा फतवाच जाहीर केलाय महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलीक या महान व्यक्तीमत्वाने. हे तेच आहेत जे काही दिवसांपूर्वी चपाती प्रकरणात गाजत होते. अगोदर निकृष्ट जेवण देण्याचा आरोप त्यात पुन्हा हे धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकरण. काय तर म्हणे गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमावर खर्च करण्याची सरकारची अजिबात इच्छा नाही आहे. हे निवासी आयुक्त इतक बरळेपर्यंत महाराष्ट्र सदनातील सांस्कृतीक विभाग मूग गिळून गप्प का बसले आहे. या मलिक महाशयांनी गेल्या वर्षी पण गणेश उत्सवास विरोध केला होता परंतु कनिष्ट अधिकारी नंदिनी आव्हाडे यांनी कडाडून विरोध करून नाकावर टिच्चून गणेशोत्सव साजरा केला. अशी महाराष्ट्रद्वेशी / हिंदू द्वेशी भूमीका मांडताना लाज का वाटत नाही या महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या चमच्यांना. जर महाराष्ट्र सरकारला जमत नसेल तर महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात द्या आम्ही धुमधड्याक्यात साजरा करू आमचा गणेशोत्सव तुम्ही फक्त इफ्तार पार्ट्या साजऱ्या करा. तसेही आणि काही दिवसातच या महाराष्ट्राची जनता तुमचे विसर्जन करणार आहे त्यामूळे काय भुंकायचे ते भुंकून घ्या
Comments
Post a Comment