शंभू राजे


नुकत्याच वाचनात आलेल्या छावा कादंबरीतील शंभू राजेंच्या आयुष्यातील स्वकीयांकडून फसविल्या जाण्याच्या भावनेवर आधारित हे काव्य…(चूक भूल माफ असावी)


आयुष्याच्या धनुष्यातून बाण केव्हाच सुटलाय,
शब्दांच्या भात्यात फक्त एकटेपणा उरलाय,

सुटलेल्या बाणाने लक्ष्याचा वेध केव्हाच घेतलाय,
आता परिणामांचा फक्त पर्याय उरलाय.

स्वकीयांनी फसविण्याचा मला घाटच घातलाय,
गनिमांवरचा वार आज आप्तांवर उगारलाय.

आजवर प्रत्येक वार संयमाने घेतलाय,
आत्ता मात्र संयमाचा बांध फुटलाय.

विश्वासाच्या बळावर नात्यांचा डोंगर रचलाय,
विश्वासघाताच्या कंपनाने सारा डोंगर खचलाय

दुर्गवीर चा धिरु
माझे अंतरंग
http://dhiruloke.blogspot.in/

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….