फक्त ५० मीनिटे... मोहिम फत्ते

फक्त ५० मीनिटे... मोहिम फत्ते......


या दिवाळीची स्पेशल मोहिम (सगळ्यात स्पेशल २०१३ ची राजगड- तोरणा मोहिम होती  नाशिक मोहिम पार पाडायची होती. मुंबईहुन निघालो सोलार लॅंप च वाटप केल आणि उरर्वरीत वेळेत काय करायचे हा गहण प्रश्न निर्माण झाला वेळ फार कमी होता आणि "अंतर्गत सुत्रांच्या" माहितीनुसार गड सर करण्यासाठी लागणारा वेळ जास्त होता. कमी वेळात संपुर्ण गड पाहता येईल पाहता येईल अस ठिकाण ठरत नव्हत. एक मारुतीरायाची मुर्ती पाहायच ठरल पण काही "अंतर्गत" आणि "बाह्य सुत्रांनी" सांगितले ते अंतर ५-७ कि. मी. चालुन जावे लागेल. त्यामुळे "प्लान A" जवळपास फिस्कटला होता. मग ठरल मांगी-तुंगी ला जायच पण त्याला तब्बल चार तास लागतात हे "खात्रीलायक सुत्रांनी" सांगितल्याने किंचीतसा ठरलेला "प्लान B" पण फिस्कटत चालला होता. त्यामुळे मांगी तुंगीच्या बाजुच्या डोंगरावरील जैन मुर्ती पाहुन परतीला निघायचे असा "प्लान C" ठरला. पण दुर्गवीर चे Engineers Choice प्रशांत बंधुंनी प्रवाहाच्या विरोधात जावुन "खात्रीलायक सुत्रांना" डावलुन एक "भयानक" प्लान रचला तो म्हणजे फिस्कटलेला "प्लान B" सत्यात उतरावयचा त्याला अजित दादा, नितीन दादांनी खतपाणी घातले. मग काय मी पण अफवा, अंधश्रद्धा झुगारुन त्यांच्या कटात सामील झालो. सुरुवातीला प्रशांत बंधु, अजित दादा यांनी ५:०५ मिनिटांनी गड चढायला सुरुवात केली मी आणि नितीन बंधुनी ५:१० मिनिटांनी त्यांच्या पावलावर पाउल ठेवले. आमच्या मागुन अमीत शिंदे नावाचा "चित्ता" येतच होता. मग मजल दरमजल करीत मी अजित दादा, प्रशांत बंधु, प्रफुल्ल बंधु, अमित बंधु, आणि नाशिकचे एक शिलेदार(राव नाव आठवत नाही तुमच समजुन घ्या) आम्ही एकदम "फ्रंट फुट" वर बॅटिंग करत निघालो मध्येच विवेक दादांची आणि स्नेहा ताईंची भेट घेवुन निघालो. जिकडे मांगी तुंगी ही मॅच पुर्ण करायला चार तास लागणार हे "खात्रीलायक सुत्रांनी" सांगितल त्याचा पहिला पॅावर प्ले आम्ही अवघ्या ५० मिनिटात पुर्ण केला. आम्ही सर्व (फक्त अमित नावाचा चित्ता सोडुन) ५० व्या मिनिटाला तुंगीला पोचलो. तोवर अमित नावाचा "चित्ता" तुंगीचा तो घेरा पुर्ण करुन पण आला म्हणजे आम्ही तुंगी ला ५० मिनिटात पोचलो तर तो ५ -१० मिनिट अगोदरच पोचला होता.पहिला "पॅावर प्ले" जोरात खेळल्यामुळे थोडासा आरामात मांगीच्या दिशेने निघालो आणि पुढच्या पंधरा मिनिटात तुंगी उतरुन मांगीच्या चढाईला सुरुवात केली. आणि दोन्हि गड मिळुन अवघ्या दोन तास चोवीस मिनिटात मोहिम संपवीली.मागुन आलेल्या शिलेदारांनी तुंगी पुर्ण केला(काहिंनी पुंगी पण वाजवली अस ऐकल)
गडावर गड अस्तित्वात नव्हताच त्याच एक "जैन तिर्थक्षेत्र" झाल्याच प्रकर्षाने जाणवलं. सगळीकडे लोखंडी जाळ्यांत बांधुन ठेवलेल्या मुर्त्या नजरेत येत होत्या. त्यात अजुन भर म्हणुन बाजुचा डोंगर "पोखरुन" त्यात अजुन एक मुर्ती कोरली जात होती. असो तो धार्मिक वाद नको !

पण या मोहिमेतुन एक मात्र शिकलो.....
अफवांवर विश्वास ठेवु नये 

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….