विवेकानंद व्याख्यानमाला - २०१४


माझ थोडसं Timing चुकल म्हणून मी श्री नथुराम गोडसे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भेट घेउ शकलो नाही याची सल कायम मनात राहील पण त्यांचे विचार जगणा-या श्री. शरद पोंक्षे यांना आज जवळून पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाली हे सुख मला आयुष्यभर पुरेस आहे…

विद्यार्थी उत्कर्ष मंडळ तर्फे आज सावरकरांचे विचार या विषयावर श्री शरद पोंक्षे यांचे व्याख्यान ऐकले. आज ख-या अर्थाने समजलं सावरकर हे लोकांना "समजायला" "काही वर्ष" जातात आणि जेव्हा ते "समजतात" तेव्हा "ज्याला ते समजतात" ते "चांगलेच समजून जातात" कि आपल्या देशाची "गुलाबाने" काय आणि कशी वाट लावली (हे "गुलाब" म्हणजे काय हे शरद पोंक्षेच आजच व्याख्यान ऐकना-यांना चांगलच माहित आहे)

आजवर मी शरद पोंक्षे ना अभिनेता म्हणून ओळखत होतो पण कणखर, ज्वलंत, परखड वक्ता हि नवीन ओळख मी आज अनुभवली. खर तर मी सावरकर आणि नथुराम गोडसे यांची पुस्तके घेऊन गेलेलो ज्यावर मला "वक्ते शरद पोंक्षे" यांची स्वाक्षरी हवी होती.पण त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते शक्य झाल नाही … बघू पुन्हा कधी योग येतो.  (https://www.facebook.com/sharad.ponkshe.9)

या व्याख्यानमालेच आयोजन करणा-या श्री अभिजित घाडी व उत्कर्ष विद्यार्थी मंडळ च्या कार्यकर्त्यांचे हार्दिक आभार…। खर मी अभिजित घाडी यांना फेसबुक वरून २०१० पासून ओळखतो पण ते इतक्या चांगल्या संस्थेत कार्यरत असतील अस वाटलं नव्हत. अभिजित दादा तुमच्या कार्याला प्रणाम !! आणि आम्हाला सुद्धा तुमचे सभासद बनवून या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी द्यावी हि विनंती
पुढील व्याख्यान :-
27 नोव्हेंबर 2014
निळू दामले
विषय: आरक्षण

स्थळ : सदगुरू भालचंद्र महाराज किंडागण (लालमैदान),
गणेश टॉकीजच्या मागे ,
लालबाग, मुंबई - 400 012.

जय शिवराय

Comments

Popular posts from this blog

खचून जाऊ नका - Be Brave

जन्मदिनाच्या शिवमय शुभेच्छा….