एक सच्चा बहादूर:- लाल बहादूर शास्त्री




एक सच्चा बहादूर:- लाल बहादूर शास्त्री 

लाल बहादूर शास्त्री एक महान स्वातंत्र्य सैनिक. जय जवान… जय किसान….. चे प्रणेते. जन्म २ ऑक्टो. १९०४. बालपण आणि संपूर्ण आयुष्य अतिशय साधेपणाने  गेले.  ९ जून १९६४ साली ते भारताचे पंतप्रधान झाले. आणि १९६५ चे भारत पाकिस्तान युद्ध त्यांच्या काळात झाले. हे युद्ध अजून काही दिवस चालले असते पाकिस्तान हा देश जगाच्या नकाशावरून संपूर्णपणे नष्ट झाला असता. पुढे विदेश दौ-यावर असताना त्यांचा संशयासपद मृत्यु झाला.  संपूर्ण जगाला त्यांचा मृत्यु हृदयविकाराने झाला असे सांगण्यात आले, परंतु त्यांच्या पत्नी ललिता शास्त्री व मुलगा सुनील शास्त्री यांच्या मतानुसार लाल बहादूर शास्त्रीवर विषप्रयोग झाला होता. यासाठी त्यांच्या स्वयंपाक्याला अटक करण्यात आली परंतु नंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली. ताश्कंद करावर सही कारण लाल बहादूर शास्त्रीना मान्य नव्हत पण त्यांना मजबुरीने त्यावर सही करावी लागली व त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी किंवा सदर बाबतीचा धक्का घेतल्याने त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला असावा. आजपर्यंत भारत सरकार ने सुरक्षेचे कारण देऊन त्या घटनेचा अहवाल जगासमोर आणलेला नाही.  
असे हे उत्तुंग व्यक्तीमत्व. साधी राहणी, उच्च विचारसरणी…. देशाचे पंतप्रधान असूनही कोणतीही संपत्ति त्यांच्या नावावर जमा नव्हती उलट कर्जच काढून ते घर चालवत. "जय जवान, जय किसान" असा अनोखा नारा देत त्यांनी जवान आणि किसान हेच देशाचे भविष्य असल्याचे देशाला पटवून दिले होते.
अश्या ख-या वाघाला माझे अंतरंगतून शतश: प्रणाम   
जय शिवराय 
जय हिंद 
दुर्गवीर चा धिरु 

Comments

Popular posts from this blog

विठ्ठल

"स्वार्थ" आणि "परमार्थ"

रायगड प्रदक्षिणा - २०१८ (वर्ष १७ वे)